बेळगांव:राष्ट्रीय वन हुतात्मा दिनानिमित्त बेळगावातील अरण्य खात्यातर्फे हुतात्मा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहण्यात आली. राष्ट्रीय वन हुतात्मा दिन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळी उपस्थित होते. प्रारंभी हुतात्मा स्मारकाला प्रमुख पाहुण्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. जंगली प्राण्यांचे आणि जंगलाचे संरक्षण करताना हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांची नावे वाचण्यात आली. राष्ट्रीय वन हौतात्म्य दिनाचे दरवर्षी अकरा सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात येते.
वन्य प्राण्यांचे आणि जंगलाचे संरक्षण करणे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. वन खात्याच्या कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे उदगार प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायाधीश टी. एन. इनवळी यांनी काढले.मुख्य अरण्याधिकारी मंजुनाथ चव्हाण, आय जी पी चेतनसिंह राठोड, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनीही हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून हौतात्म्य पत्करलेल्या वन खात्याच्या कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली.
https://youtube.com/shorts/gFTYaoiaEcc?si=SkCAnkZIAZSXHEKO

