सरकारचे शेतकरीविरोधी धोरण – बेळगाव भाजपकडून तीव्र इशारा
बेळगावात आज भाजप महानगरच्या वतीने हॉटेल सेंट्रल बुटीक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यसभा खासदार ईरन्ना कडाडी, आमदार अभय पाटील, माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष अनिल बेनके यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
पावसामुळे जिल्ह्यात तसेच राज्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांची घरे कोसळली आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाकडून पंचनामा, सर्वेक्षण वा मदत जाहीर करण्यात आलेली नाही. जिल्हा मंत्र्यांसह सरकारचे हे निष्क्रिय धोरण सध्या टीकेचे धनी ठरत आहे.
भाजप नेत्यांनी स्पष्ट केले की, पीडित शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना तातडीने मदत न मिळाल्यास पक्ष उग्र आंदोलन उभारेल. या पत्रकार परिषदेला माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष गीता सुतार, मुख्य प्रवक्ते राजशेखर धोनी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

