चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील मोरारजी देसाई निवासी शाळेतील ११९ मुलांना अन्नातून विषबाधा झाली असून जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन निवासी शाळेच्या प्राचार्या आणि वार्डन यांना निलंबित करण्यात आले आहे.
अल्पसंख्यांक विभागाकडून चालवण्यात येणाऱ्या मोरारजी देसाई निवासी शाळेत एकूण ४३९ विद्यार्थी आहेत. यापैकी ११९ मुलांना जेवण आणि नाश्त्यातून विषबाधा झाल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना त्रास झाल्यावर चिकोडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी अन्न, धान्य आणि पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
https://youtube.com/shorts/HW0wmGYdwoc?si=-DQJkG29hToHKuzE
उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ११९ विद्यार्थ्यापैकी ३८ विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७१ विद्यार्थ्यावर उपचार सुरु आहेत. बालरोग तज्ज्ञ विद्यार्थ्यावर उपचार करत असून वैद्यकीय अधिकारी विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. काही दिवसापूर्वी शाळेची तपासणी करण्यासाठी आलेल्या पथकाने उत्तम दर्जाचा भाजीपाला वापरण्या बरोबर स्वयंपाकघर आणि शौचालयाची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या

