बेळगाव :
बेळगाव शहरातील बुधवार पेठ कॉर्नरचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकत नगरसेवक नितीन जाधव यांनी एक ऐतिहासिक काम करून दाखवले आहे. गेल्या साठ वर्षांपासून या ठिकाणी गवळी समाजाकडून शेण आणि इतर कचरा टाकला जात होता. या समस्येचे निराकरण करण्यासाठी कोणीही ठोस पाऊल उचलले नव्हते.
मात्र, नगरसेवक नितीन जाधव यांनी आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत गवळी समाजाशी संवाद साधला. चर्चेअंती पर्यायी व्यवस्था करण्यात आली आणि त्या ठिकाणाचे सुशोभीकरण करण्यात आले. भिंतीवर आकर्षक चित्रकला करण्यात आली असून, नागरिकांसाठी बसण्याची सोय (बेंचेस) देखील करण्यात आली आहे.
https://youtu.be/3hyAAB0duSY
या बदलानंतर बुधवार पेठ आणि टिळकवाडी परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून नगरसेवक जाधव यांचे कौतुक केले आहे. जाधव यांनी देखील गवळी समाजाचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमाच्या वेळी संतोष पाटील, दीपक हरदी, हर्षद कलघटगी, आनंद कबाडी, समीर गवळी, चेतन बेटगेकर, सुभाष भवानी, प्रमोद पोटे, तसेच महानगरपालिकेचे अधिकारी लक्ष्मण मोहिते आणि गजानन मुळीक उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छता आणि सौंदर्य दोन्ही वाढले असून, नागरिकांकडून हा प्रयत्न "खऱ्या अर्थाने जनसेवा" म्हणून गौरवला जात आहे.

