खानापूर : मराठा मंडळ संचालित ताराराणी हायस्कूल, खानापूरने शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या एसएसएलसी (इयत्ता दहावी) परीक्षेत 98.51% असा भक्कम निकाल नोंदवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. विद्यार्थिनींच्या या उज्ज्वल यशामुळे परिसरात आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.
यंदा एसएसएलसी परीक्षेसाठी शाळेतील एकूण 202 विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी तब्बल 199 विद्यार्थिनी उत्तीर्ण होत शाळेचा निकाल 98.51% इतका उंचावला आहे.
विशेष श्रेणी - 42 प्रथम श्रेणी -112 द्वितीय श्रेणी- 26 तृतीय श्रेणी -19
मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनींनी यश मिळवत शाळेची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या भव्य यशामागे मराठा मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू मॅडम यांचे दूरदर्शी नेतृत्व व प्रेरणा लाभली. तसेच संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव पाटील सर व श्री परशराम गुरव सर सातत्यपूर्ण प्रोत्साहन, शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल जाधव सर यांचे सक्षम नियोजन आणि सर्व शिक्षकवृंद यांचे निष्ठापूर्ण मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. विद्यार्थिनींची चिकाटी, जिद्द आणि पालकांचा भक्कम पाठिबा यामुळेच हा उल्लेखनीय निकाल शक्य झाला आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

