LIVE TV LocalCrimeStateNationalInternationalPoliticsBusinessEducationTechnologyEntertainmentSportsHealthFeatureTravelingBeautyRecipes

*हेस्कॉमच्या निष्काळजीपणाचा बळी ठरले दोन जंगली हत्ती*

Advertisement
हेस्कॉमच्या निष्काळजीपणाचा बळी ठरले दोन जंगली हत्ती

खानापूर (2 नोव्हेंबर):
खानापूर तालुक्यातील सुलेगाळी परिसरात शनिवारी पहाटे घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोन जंगली हत्तींचा विद्युत प्रवाह लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. ही दुर्घटना हेस्कॉम (HESCOM) विभागाच्या निष्काळजीपणामुळे घडल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराई गावाजवळील शेतातून जाणारी वीजवाहिनी काही दिवसांपासून तुटलेली होती. शेतकऱ्यांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्या तारेची दुरुस्ती करण्यास टाळाटाळ केली. अखेर काल संध्याकाळी आणखी एक वीजतार तुटून खाली पडली आणि ती थेट सौर ऊर्जेवर चालणाऱ्या झटका करंट यंत्रणेशी संपर्कात आली. परिणामी त्या तारेतून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह सुरू झाला.

दरम्यान, अन्नाच्या शोधात त्या परिसरात आलेले दोन जंगली हत्ती या विद्युत तारेच्या संपर्कात आले आणि क्षणात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून हत्तींच्या मृतदेहांची तपासणी केली असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
हलगा गावचे सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देताना सांगितले,

> “हेस्कॉम विभागाच्या निष्काळजीपणामुळे दोन निरपराध प्राण्यांचे प्राण गेले. तुटलेल्या तारांची दुरुस्ती वेळेत झाली असती तर हे टाळता आले असते. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी,” अशी आमची ठाम मागणी आहे.

 

स्थानिक नागरिकांनीही वीज विभाग आणि वन विभागाने समन्वय साधून अशा दुर्घटना टाळाव्यात, तसेच ग्रामीण भागातील धोकादायक वीजवाहिन्यांचे तातडीने सर्वेक्षण करून दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे —
निसर्ग आणि वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत जबाबदार यंत्रणा किती जागरूक आहे?
निष्काळजीपणा सुरू राहिला, तर अशा दुर्दैवी घटना भविष्यात आणखी वाढतील, असा इशारा पर्यावरणप्रेमी देत आहेत.
Advertisement
Author
KhushiHost News CMS Pro ®
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
*बेन्सन्स इंटरनॅशनल अकॅडमी शाळेचा गौरव**पाणी वाचवा जीवन वाचवा स्केटिंग रॅली द्वारे केली जनजागृती**नॅशनल स्केटिंग स्पर्धेत* बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरी**कंग्राळी बुद्रुकमध्ये महालक्ष्मी यात्रेची दिमाखदार सुरुवात**मराठा लाईट इन्फंट्रीत भैरव बटालियन रायझिंग डे उत्साहात; कमांडोंचे दिमाखदार संचलन**मैदानावर माकडाची एन्ट्री; बाटलीतून पाणी पिताना पाहून सर्वजण थक्क**मण्णूरमध्ये कलमेश्वर हायस्कूलच्या 100% निकालाचा जल्लोष; गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार**बेळगावातील मराठा मंडळ हायस्कूलचा दमदार निकाल; 94.56% यश, प्रतिज्ञा उंदरे अव्वल**बेळगाव मधील Lenskart च्या विविध शाखांवर श्री राम सेनेची धडक कारवाई.**संत मीरा इंग्रजी शाळेचा दहावीचा निकाल 97,82/*