बेळगाव :
सायबर गुन्ह्यांविषयी सजगता निर्माण करण्यासाठी डीएमएस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स तर्फे विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम क्विक हील फाऊंडेशनच्या “सायबर शिक्ष फॉर सायबर सुरक्षा” या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून राबविण्यात आला.
या प्रसंगी सहाय्यक उपनिरीक्षक अप्पासाहेब (ट्रॅफिक दक्षिण पोलिस ठाणे) व पोलीस कॉन्स्टेबल दुंडप्पा गुरुपाद हडपड (कॅम्प पोलिस ठाणे, बेळगाव) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमात प्राचार्य आनंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सायबर सुरक्षेचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी डिजिटल युगात सुरक्षित व जबाबदार नागरिक होण्याची गरज प्रतिपादन केली.
विशेष आकर्षण ठरली ती सायबर वॉरियर्स विद्यार्थ्यांची नाटिका, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शातून सायबर गुन्ह्यांविरुद्ध लढण्याचा संदेश देण्यात आला.
https://youtube.com/shorts/do6eBgz0Fn4?si=k9sHLvBx80NZCxE-
उपक्रमाचे नियोजन आणि अंमलबजावणी सायबर वॉरियर्सचे अध्यक्ष संजना कदम, सचिव साक्षी कडोलकर, उपक्रम संचालक वैष्णवी तेलसंग व प्रसारमाध्यम प्रमुख अंकिता देशपांडे यांनी यशस्वीपणे केले. शिक्षक समन्वयक प्रा. वर्षा उचगावकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सायबर सुरक्षेबाबत समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.

